भारत चीनचा काटा काढणार ? केंद्र सरकारची मोठी रणनीती तयार

नवी दिल्ली : दिल्लीत केंद्र सरकारची नुकतचि एक उच्चस्तरीय बैठक झाली असून यामध्ये भारत आता इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती कंपन्यांवर जास्त भर देण्याबाबत विचार करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच देशात फोन निर्मितीला आणखी जास्त बळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अॅपल, सॅमसंग, विवो, ओप्पो अशा कंपन्यांना त्यांची निर्मिती भारतातून करावी, जेणेकरून भारत एक एक्स्पोर्ट हब होण्यास मदत होईल. देशात रोजगार, महसूल आणि परकीय चलन वाढवणे हा यामागचा उद्देश असून जागतिक आणि स्थानिक निर्मात्यांना चीनसाठी भारत हा भक्कम पर्याय देण्याचा प्रयत्न आहे, अशी एका अधिकाऱ्याने दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे चीन आणि जपान यांच्यातील पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात खंडित झाली आहे. त्यामुळे जपानने निर्मिती कंपन्यांना चीनमधील प्लांट बाहेर हलवण्यासाठी २.२ बिलियन डॉलर्सची आर्थिक मदत देण्याची तरतूदही केली आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आता भारत सज्ज झाला आहे.