लॉकडाऊनशी संबंधित केंद्र सरकारचे दिशानिर्देश

- सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी मास्क लावणं बंधनकारक आहे.


- सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींदरम्यान १ मीटर इतक्या अंतराचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे.


- सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास दंडासह कठोर कारवाई केली जाईल. - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, मद्यपान, गुटखा आणि तंबाखू खाण्यावर बंदी आहे.


- दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं आवश्यक आहे. दुकानावर एकच वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत. ग्राहकांना रांगेत उभं करावं.


- कुठल्याही संघटनेला किंवा संस्थेला पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र आणण्यास मनाई आहे.


- लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक नागरिकांच्या एकत्र येण्यावर मनाई आहे. लग्न समारंभातही सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे.


- अंत्यसंस्कारावेळीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. अंत्यविधीला २० पेक्षा अधिक नागरिक सहभागी होऊ शकत नाही.


- खासगी ऑफिसेस किंवा संस्थांच्या कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग, मास्क, हॅण्डवॉश आणि सॅनिटायजर आवश्यक आहे.


- कार्यालयांमध्ये आणि कंपन्यांच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करणं आवश्यक आहे.


- कामाच्या ठिकाणी दोन शिफ्ट दरम्यान काही वेळाचं अंतर ठेवावं. कर्मचाऱ्यांना एकचवेळी दुपारच्या जेवणाची सुट्टी न देता वेगवगेळ्या वेळेत सोडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे.


- कामाच्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करणं बंधनकारक असेल.


- करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जवळच्या हॉस्पिटल्सची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जावी.


- संस्थांनी आणि कंपन्यांनी कामाच्या ठिकाणी वारंटाइनसाठीही जागा उपलब्ध करून द्यावी. गर्दी होईल अशा मोठ्या बैठका घेणं टाळलं पाहिजे.


- कामाच्या ठिकाणी सफाई आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे.