लॉकडाऊनला संपवून चालणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : लॉकडाऊनला संपवून चालणार नाही. कोरोनाला हरवण्यासाठी हाच एकमात्र उपाय आहे. राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार त्यात बदल करावेत, अशा सूचना नरेंद्र मोदी यांनी केल्या. कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजाराशी सामना करताना भारताला मिळालेल्या यशाला जागतिक मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांचे भारत सरकार कौतुक करत आहे. कोरोनाच्या संकटापासून ग्रामीण भारत मुक्त राहावा यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं. देशाच्या अनेक भागांमध्ये हळूहळू आर्थिक व्यवहार, उद्योग सुरू झाले आहेत. येत्या काळात अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हे काम अधिक वेगाने होईल. कोरोनाविरुद्धच्या लढाईल आता लक्ष केंद्रीय करणे गरजेचं आहे. या मार्गावर पुढील काळात अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी रणनीती बनवून राबवली गेली पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.